Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, June 13, 2021

भारताचा विशेषत

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल:


विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.
पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.
आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.
शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.
पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.
पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात.
पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
नकाशात हिरवा रंग वनक्षेत्रासाठी वापरतात.
भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. हे रेखावृत्त मिर्झापूर (उ. प्र.) वरून ठरते.
तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात. याचा विस्तार 13 किमी आहे. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते.
वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते.
संदेशवहनासाठी आयनांबर या थराचा उपयोग होतो.
इंदिरा पॉंईट हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे.
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7 वा क्रमांक आहे.
मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास 7517 किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे.
भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत.
क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो.
गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे.
भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास द्वीपकल्प म्हणतात.
कांचनगंगा हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. 
दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असे म्हणतात.
अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.

ज्या सुजलाम सुफलाम भारतभूमीवर आपण वास्तव्य करतो. त्याबद्दल प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक काळात भारत देश हा भारत. आर्यवर्त आणि हिंदुस्थान (सोने की चिडिया) या विविध नावांनी ओळखला जात असे. प्राचीन काळातील पराक्रमी राजा भरत यावरून भारततर आर्यवंशीय लोकांच्या भूमीवरून आर्यावर्तआणि सिंधुनदीमुळेहिंदुस्थान अशा नावांचा उल्लेख केला जात असे. युरोपियन लोकांनी या देशाला मूळ शब्द सिंधूपासून तयार झालेल्या इंडियाअसा उल्लेख करण्यास सुरुवात केली.
० भारत हा देश सर्व ऋतूंमध्ये सदाबहार दिसणारा देश आहे.
० भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. आहे.
० क्षेत्रफळाचा विचार करता रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियानंतर भारताचा सातवा (२.४२ टक्के) क्रमांक लागतो.
० भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेले आहे.
० भारताची दक्षिणोत्तर लांबी-३,२१४ कि.मी. असून पूर्व-पश्चिम २,९३३ कि.मी. आहे.
० भारताची भूसीमा सरहद्दीची लांबी- १५,२०० कि.मी. असून सीमेवर सात राष्ट्रे आहेत.
० भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची एकूण लांबी- ६,१०० कि.मी. आहे.
० तर अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटसमूह मिळून ७,५१७ कि.मी. आहे.
० सन २००१च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या- १०२ कोटी ८७ लाख ३७,४३६
० सन २०११ मध्ये भारताची १५वी जनगणना पार पडणार आहे.
० २००१च्या नुसार लोकसंख्येची घनता- ३२४ व्यक्ती प्रति चौ.कि.मी.
० भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य- अरुणाचल प्रदेश
० भारतात पुरुष-स्त्री प्रमाण- १००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया
० सर्वाधिक स्त्री प्रमाण असलेले राज्य- केरळ (१०५८ स्त्रिया)
० केरळ राज्याला युनेस्कोने बेबी फ्रेंडली स्टेटचा दर्जा दिला आहे.
० भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेश मध्ये आहे. सर्वात कमी- सिक्कीम
० २००१च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८% आहे.
० भारतात सर्वाधिक साक्षर राज्य- केरळ, सर्वात कमी-बिहार
० भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य- राजस्थान (राजधानी-जयपूर)
० क्षेत्रफळातील सर्वात कमी राज्य-गोवा (राजधानी-पणजी)
० मध्य प्रदेश (राजधानी-भोपाळ) राज्याची सीमा सर्वाधिक राज्यांना जोडून आहे.
० भारतातील नऊ राज्यांना व चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभला आहे.
० आजमितीस भारतात एकूण २८ घटक राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.
० २६ वे राज्य-छत्तीसगढ-निर्मिती-१ नोव्हेंबर २०००- राजधानी-रायपूर.
० २७ वे राज्य-उत्तरांचल-निर्मिती ९ नोव्हेंबर २०००- राजधानी-डेहराडून.
० २८ वे राज्य-झारखंड-निर्मिती १५ नोव्हेंबर २०००- राजधानी-रांची
० वरील तिन्ही राज्यांची निर्मिती भारतीय जनता पार्टी सत्तेवर असताना करण्यात आली.
० कवरती ही लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.
० मॅकमोहन रेषा-भारत व चीन देशांदरम्यान आहे.
० डय़ुरंड रेषा-पाकिस्तान व अफगाणिस्तान देशांदरम्यान आहे.
० रॅडक्लिफ रेषा-भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आहे.
० अरुणाचल प्रदेश भारताचे चोविसावे राज्य आहे तर गोवा पंचविसावे राज्य आहे.
० आसाम राज्याची सीमा भूतान व बांगलादेश या दोन देशांना भिडली आहे.
० सिक्कीम राज्याची सीमा नेपाळ, भूतान व चीन या तीन देशांना संलग्न आहे.
० मिझोराम राज्याची सीमा म्यानमार व बांगलादेश या दोन देशांना संलग्न आहे.
० भारतातील अतिपूर्वेकडील राज्य-अरुणाचल प्रदेश
० भारतातील सर्वात मोठी आदिवासीजमात-संथाल
आदिवासी जमाती व प्रदेश
१) गारवो, खासी-आसाम, मेघालय, नागालँड २) हो. छोटा नागपूर
३) तोडा-निलगिरी पर्वत (तामिळनाडू) ४) वारली, भिल्ल-महाराष्ट्र
५) गोंड, कोलाम-मध्य प्रदेश
० अरवली पर्वतरांग भारतातील सर्वात प्राचीन रांग आहे.
० पश्चिम घाटाला सह्य़ाद्री म्हणून ओळखले जाते.
‘‘गुरुशिखर’’ हे अरवली पर्वतरांगेत सर्वोच्च शिखर आहे.
‘‘दोडाबेट्टा’’ हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.
पंचमढीहे सातपुडा पर्वतरांगेत सर्वाधिक
उंचीचे ठिकाण आहे.
थंड हवेची ठिकाणे
१) महाराष्ट्र-चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर, तोरणमळ, पाचगणी
२) हिमाचल प्रदेश-डलहौसी, सिमला, कुलू-मनाली
३) उत्तरांचल-मसुरी, नैनिताल
४) तामिळनाडू-कोडाईकॅनॉल
५) प.बंगाल-दार्जिलिंग, सिलीगुडी
६) राजस्थान-माऊंट अबू
० कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात उंच व मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
० कर्नाळा पक्षी अभयारण्य भारतातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
० पेंच राष्ट्रीय उद्यान प्रियदर्शिनी-इंदिरा गांधीनावाने ओळखले जाते.
० महाराष्ट्रात एकूण ३३ अभयारण्यांपैकी सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली अभयारण्यास १४ मे २००४ रोजी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे.
० भारतात एकूण ३८ व्याघ्र प्रकल्प आहे. (३८वा व्याघ्र प्रकल्प-परंबीकुलम अभयारण्य-केरळ)
० भारतात दर चार वर्षांनी वाघांची गणना होते.
० २००७-०८च्या आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २०.६४% क्षेत्र वनांखाली आहे. महाराष्ट्रात सध्या २०.१७ क्षेत्र वनक्षेत्र आहे.
० चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन-कर्नाटक
० सध्या बहुचर्चित तिहरी प्रकल्प उत्तरांचल राज्यात भागीरथीनदीवर विकसित होत आहे. या प्रकल्पाला रशिया या देशाने मदत केली आहे.
० भारतातील सर्वात मोठे गोडय़ा पाण्याचे सरोवर-वुलर सरोवर
० भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर-सांबर सरोवर
० जगप्रसिद्ध पुष्कर सरोवर-अजमेर (राजस्थान) येथे आहे.
० भारतात स्थलांतरीत होतीस झूमिंगम्हणतात.
० भारताचे नंदनवन म्हणून काश्मिरओळखले जाते.
रॉयलसीमाहा प्रदेश आंध्र प्रदेश राज्यात आहे.
० चंदिगड हे भारतातील पहिले सुनियोजित शहर आहे.
० भारतातील पहिले धूम्रपानमुक्त शहर म्हणून चंदिगडओळखले जाते.
० ली कार्बुझियर यांनी चंदीगड शहराची रचना केली.
० भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला.
शहरे व त्यांची टोपणनावे :
१) हैद्राबाद-हायटेक सिटी २) बंगलोर-इलेक्ट्रॉनिक शहर
३) कोलकाता-राजवाडय़ांचे शहर ४) बनारस-मंदिराचे माहेरघर
५) जयपूर-गुलाबी शहर ६) मुंबई-सात बेटांचे शहर
७) अमृतसर-सुवर्ण मंदिराचे शहर ८) नाशिक-यात्रेकरूंचे शहर
० प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा येथे आहे.
० प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई-तामिळनाडू येथे आहे.
० प्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर ओरिसा येथे आहे.
० श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० केंद्र सरकारने गंगा नदीला राष्ट्रीय नदीम्हणून जाहीर केले.

ग्रहांविषयी माहिती

·         बटुग्रह - सन 2006 पर्यंत प्लूटो या ग्रहास सूर्यमालिकेत नवव्या ग्रहाचे स्थान दिले होते. परंतु; आंतरराष्ट्रीय खगोल समितीने परीभ्रमणाबाबत केलेल्या नवीन नियमानुसार प्लूटोचे परिभ्रमन ग्रह नसल्यामुळे त्यास बटुग्रह असे नाव देण्यात आले आहे. 

·         लघुग्रह - मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यान असलेल्या ग्रहाच्या पटयाला लघुग्रह असे म्हणतात. 

·         अंर्तग्रह - बूध ते मंगळ या ग्रहांना अंर्तग्रह असे म्हणतात. 

·         बर्हिग्रह - गुरुनंतरच्या इतर ग्रहांना बर्हिग्रह असे म्हणतात. 

·         धूमकेतू - सूर्याभोवती लंबकार कक्षेत फिरणार्‍या, जास्त परिभ्रमन काळ असलेल्या खगोलीय वस्तूला धूमकेतू म्हणतात. 

·         उल्का - जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते आणि ती पृथ्वीच्या गुरुत्वीय बळामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. अशी वस्तू पृथ्वीच्या वातावरणातून पृथ्वीकडे येत असतांना वातावरणाशी घर्षण होवून ती जळते व प्रकाश निर्माण होतो. याला उल्का असे म्हणतात.

वातावरणाविषयी माहिती

पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

·         भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे. 

·         समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.

 

हवेतील घटक

घटकाचे प्रमाण

नायट्रोजन

78.03%

ऑक्सीजन

20.99%

कार्बडायक्साईड

00.03%

ऑरगॉनवायु

00.94%

हैड्रोजनवायु

00.01%

पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक

0.01%

एकूण हवा

100.00%



2. तपस्तब्धी

·         भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

 

3. स्थितांबर

·         तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते. 

·         ओझोनोस्पीअर - स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात. 

·         मध्यांबर - स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

 

4. आयनाबंर

·         मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात. 

·         इ-लेअर - या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात. 

·         एफ-लेअर - त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

 

5. बाहयांबर

·         आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.

भारतातील प्रमुख खनिजे

खनिजे

प्रमुख उत्पादक केंद्र

हीरे

पन्ना (म.प्र.), मिर्झापूर (उ.प्र.)

सोने

कोलार, हट्टी (कर्नाटक), रामगिरी (आ.प्र.)

तांबे

हजारीबाग (बिहार), खेत्री (राजस्थान)

टिन

हजरीबाग (बिहार)

बॉक्साईड

बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश

टंगस्टन

राजस्थान, प. बंगाल

युरेनियम

जादुगुडा, उ.प्रदेश

कोबाल्ट

राजस्थान, केरळ

सल्फर

तामिळनाडू, केरळ

जिप्सम

राजस्थान, तामिळनाडू

खनिज मिठ

मंडी (हिमाचल प्रदेश)

पांढरा दगड

राजस्थान

तांबडा दगड

जोधपूर

लिग्नाईट कोळसा

नेवेली (तामिळनाडू)

चांदी

गोल्डफिल्ड (कर्नाटक), सिंगभूम (बिहार)

डोलोमाईट

मध्य प्रदेश व ओरिसा

ग्रॅफाईट

राजस्थान, म.प्रदेश, आंध्र प्रदेश

थोरिअम

त्रावनकोर (केरळ), आंध्र प्रदेश

अॅस्बेस्टॉस

कर्नाटक व राजस्थान

लोखंड

सिंगभूम व मानभूम (बिहार), मयूरगंज व सुंदरगड(ओरिसा), बरव्दान व विरभूम (प.बंगाल)

क्रोमाईट

सिंगभूम व भागलपूर (बिहार) रत्नागिरी, सालेम (तामिळनाडू) लडाख (काश्मिर)

चुनखडी

भंडारा व यवतमाळ (महाराष्ट्र), पंचमहाल (गुजरात), इंदूर (म.प्रदेश), सिंगभूम (बिहार), सिंग्रेनी (आंध्र प्रदेश)

दगडी कोळसा

राणीगंज (प.बंगाल), बोकारो, गिरीधी, करणपूर व झारीया (बिहार) सिंग्रेनी, जयपूर, चंद्रपूर

पेट्रोलियम

खंबायत, अंकलेश्वर, ओलपाड, कलोल, नवागाव, रुद्रसागर, लकवा, दिग्बोई, बॉम्बे हाय

 

जागतिक भूगोलातील विशेष ठिकाणे

·         जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर

·         महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर) 

·         सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी. 

·         सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी. 

·         सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया 

·         सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल) 

·         सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)  

·         सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी. 

·         सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी. 

·         सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे

·         सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी) 

·         सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची 

·         सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार. 

·         सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)

·         सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी. 

·         सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी. 

·         सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी. 

·         सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी. 

·         सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी) 

·         सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान) 

·         सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी. 

·         सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें. 

·         सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका) 

·         सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी. 

·         सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी. 

·         सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर) 

·         सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी 

·         सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011) 

·         सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011) 

·         सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती. 

·         सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती) 

·         सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000) 

·         सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी. 

·         सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क 

·         सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड) 

·         सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी. 

·         सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी. 

·         सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी. 

·         सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.

·         सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी. 

·         सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.) 

·         सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी) 

·         सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क) 

·         सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी. 

·         सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी. 

·         सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे

·         सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी 

·         सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर 

·         सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी 

·         सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन  

·         सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक 

·         सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क 

·         सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन

·         सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी. 

·         सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा - मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.) 

·         सर्वात मोठी संसद - नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)

·         सर्वात मोठे लष्कर - रशियन लष्कर 50 लाख (1985)   

·         सर्वात लांब भिंत - चीनची भिंत 3500 कि.मी. 

·         सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) - खरगपूर (प.बंगाल) 820 मी. 

·         सर्वात मोठा ग्रह - गुरु 

·         पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह - शुक्र

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग 
1. कोकण किनारपट्टी 
2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट 
3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

1. कोकण किनारपट्टी :

·         स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.

·          

·         विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.

·          

·         लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमीरुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  

·          

·         क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.

·          

·          

 

2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

·         स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.

·          

·         यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

·          

·         पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

 

महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

·         स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

·         लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.


·         ऊंची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त  पूर्वेस (300 मी) कमी आहे.

·         महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.

महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी

महाराष्ट्रची कोकण किनारपट्टी :

स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.

विस्तार : उत्तरेस - दमानगंगा नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.

लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमीरुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .

उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.

क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.

कोकणातील प्राकृतिक रचना :

·         कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.

·         किनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.

·         कींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.

·         उतार पूर्व-पश्चिम दिशेस 'मंद' स्वरूपाचा आहे.

·         या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली 'भुरुपे' आढळतात.

·         उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.

·         कोकणचे उपविभाग :

·         1.उत्तर कोकण - ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.

·         हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.

·         ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.

·         लोकसंख्येची घनता अधिक.

·         नागरी लोकसंख्या जास्त.

·         दक्षिण कोकण - रत्नागिरी, सिंधुदुर्ग

·         हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.

·         ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.

·         लोकसंख्येची घनता कमी.

·         पारंपरिक व्यवसाय.

·         खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.

समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात.

1. खलाटी(पश्चिम कोकण) : समुद्र किनार्‍याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे 'खलाटी' होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.

या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.

2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश

म्हणजेच 'वलाटी' होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.

कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे

1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.

     ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे

मुंबई उपनगर : मालाड, माहीम

मुंबई : माहीम

रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट

रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग

सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल

2. पुळनी : समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना 'पुळन' असे म्हणतात.

मुंबई उपनगर : जिहू बीच

मुंबई शहर

दादर, गिरगाव

रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर

सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा

रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन

3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर 'वाळूचे दांडे' तयार होतात.

खरदांडा(रायगड)

4. बेटे : मुंबई : मुंबई बेट

रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)

अलिबाग : खांदेरी, उंदेरी

सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)

मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव

5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.

मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),

रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,

सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी

6. खनिजे : बॉक्साईट = ठाणे,

म्यंगेणीज = सिंधदुर्ग,

क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व

जिप्सम = रत्नागिरी

7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,

मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री

दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.

जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, 'डोंगरांच्या रांगा'

8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व  सागरी किल्ले

ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा

रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा

रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग

सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग

भारतगड, पधगड सजैकोत

 

देशातील नदीकाठी वसलेली शहरे

1.    झेलम -       श्रीनगर 

2.    यमुना -       आग्रा,दिल्ली 

3.    सतलज -      लुधियाना

4.    सिंधु -         लेह 

5.    गंगा -         वाराणसी 

6.    मुसी -         हैद्राबाद 

7.    ब्रह्मपुत्रा -    गुवाहाटी (गोहत्ती)

8.    तापी -        सुरत

9.    गोदावरी -    नांदेड, नाशिक 

10.  कृष्णा -       विजयावाडा 

11.  साबरमती -   अहमदाबाद 

12.  शरयू -        अयोध्या 

13.  कावेरी -      तंजावर 

14.  हुगळी -      कोलकाता 

15.  गोमती -     लखनऊ

 

पृथ्वीसंबंधीची माहिती

·         पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी 

·         पृथ्वीचा आकार - जिऑइड 

·         पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी.

·         पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी. 

·         पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी. 

·         पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी. 

·         पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी. 

·         पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी. 

·         पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी. 

·         पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी. 

·         पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी. 

·         पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला.

****************************************************************************

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages